पावसात भिजल्यावर मनाचा रंग उडतो,
पोपडे निघालेल्या भिंतीसारखा पाउस मन उघडे करतो.
काळाने झाकलेल्या जखमा परत ताज्या होतात,
ठसठसणाऱ्या आठवणी पुन्हा पुन्हा उठतात.
तुझ्याबरोबर पावसात घालवलेले काही क्षण,
मनात तरंग उठवतात, पण...
मन शांत व्हायला पाऊस थांबायची वाट बघतात!!!
No comments:
Post a Comment