गगनमंडपी चमकून गेली एक विजेची रेघ,
वाजत-गाजत मागून आले काळे काळे मेघ.
वरातीतूनी हळूच आला मृदगंधित चंचल वारा,
नवरदेवावर उधळण्या गार गार ह्या गारा.
नवरोबांचे आगमन झाले वादळवाटेवरूनी,
तप्त वधुही वाट पाहते डोळ्यात प्राण आणूनी.
पाउस आला घेउन संगती थेम्ब टपोरे गोल,
धरणीलाही उधाण आले गाऊ लागली बोल.
वृक्षलताही पाहु लागल्या वरदेवाचे रूप,
नववधूला भिजवून टाकी सर्व ऋतूंचा भूप.
पती-पत्नीचे मिलान झाले सहस्त्र जलधारांनी,
पाउस धरणी बद्ध जाहले नाजूक रेशीमतारांनी...
No comments:
Post a Comment