भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.
एकट्याची वाट माझी एकट्याने चाललो,
एकट्याची वाट माझी एकट्याने चाललो,
दो-क्षणांच्या सोबतीला सुख मानून भाळलो
वाट काट्यांचीच होती, खाच-खळगे दांडगे,
वर-वरुनी चांगले हे लोक आतून लांडगे
मीच प्रेमाने जनांना आपलेच मानले,
त्याच षंढ माणसांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसले
भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.