भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.
एकट्याची वाट माझी एकट्याने चाललो,
एकट्याची वाट माझी एकट्याने चाललो,
दो-क्षणांच्या सोबतीला सुख मानून भाळलो
वाट काट्यांचीच होती, खाच-खळगे दांडगे,
वर-वरुनी चांगले हे लोक आतून लांडगे
मीच प्रेमाने जनांना आपलेच मानले,
त्याच षंढ माणसांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसले
भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.
No comments:
Post a Comment