Monday, November 18, 2013

तुझी आठवण

तू आसपास नसताना,
संध्याकाळ ही पोकळ होते.
तुज आठव गहिरा होतो,
मन डोह सावळा होते...

विरहाच्या कातरवेळी,
सुचतात तुझी मज गाणी.
आठवणींचा किनारा शोधी,
डोळ्यांतील खारे पाणी...

No comments:

Post a Comment