Wednesday, June 15, 2011

तू आणि चंद्र...

तुझे केस, 
होती चिंब, 
चांदण्याच्या थेंबात...

तुझे नयन, 
होती गगन, 
चंद्राच्या प्रकाशात...

तुझी खळी, 
भरे सगळी, 
चांदण्याच्या धुक्यात...

तुझ्या भाळी, 
उतरू येई, 
आकाशीची चंद्रकोर...

Friday, June 3, 2011

Best Friend

मला वाटायचं तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त मी विचारायची देर आहे.
मलाही ती प्रचंड आवडायची,
जेव्हा ती मला आपला
'Best Friend' म्हणायची.
मनातलं गुपित फोडायची,
लाडात येऊन बोलायची,
लटके रागवायची,
माझ्याशी भांडायची.
गप्पा मारायची,
माझ्या कविता ऐकायची.
त्यांना उत्स्फूर्त दाद द्यायची,
माझ्यावर प्रेम करायची...


पण मला माहित नव्हतं की ती मला,
फक्त आपला 'Best Friend' मानायची...

मला खूप यातना झाल्या जेव्हा ती म्हणाली,
"मी प्रेमात पडले आहे रे त्याच्या...",
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तिची थट्टा केली,
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको झालेलं,
असा तिला मी कितीदा तरी पाहिलेलं.
मी म्हणालो, "मजा आहे बाबा एका मुलीची..."
ती म्हणाली,"तुला पण मिळेल रे साथ कोण सुंदरीची",
मन रडत असतानाही हसत होतो,
तिला कळू ना देण्याची सगळी काळजी घेत होतो.
तिला पण काहीच कळलं नाही,
प्रेमात पडलेल्या तिला काहीच वेगळा दिसला नाही...

मी पण तसदी घेतली नाही मनातलं काही बोलायची,
कारण ती मला आपला 'Best Friend' मानायची...

ती गेल्यावर मी सुन्न झालो,
आतल्या आत मग्न झालो.
तिच्या आठवणी आठवू लागलो,
त्या पुसून टाकायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो.
तिच्याशी बोलताना मी तिची खूप थट्टा करायचो,
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो.
त्याच्याशी भांडल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची,
आजही माझ्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची.
पण ती अजूनही माझ्याशी खूप बोलायची,
खूप काही सांगायचय म्हणायची.
तुला भेटायचं असे म्हणायची,
पण 'कधी' हे मात्र सांगायला विसरायची...

मनातले अश्रू मी तिला कधीच दिसू दिले नाहीत,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची

मी मात्र आतल्याआत कुढत बसायचो,
माझ्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना,
मूकपणे आपले अश्रू गिळत असायचो.
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते,
कारण माझे मनन अजून तिच्याकडे गहाण होते.
त्याचं-तिचं भांडण ती मला येऊन सांगायची,
माझ्याशी बोलून मोकळा वाटला असा म्हणायची.
स्वतःच्या वेदना लपवून तिचे बोलणे मी शांतपणे ऐकून घ्यायचो,
एक दोन गोष्टी सांगून तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो.

माझ्या 'बोलण्यापेक्षा' माझ्या 'असण्यावरच' ती समाधानी असायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

अधेमध्ये तिलापण काहीबाही हुक्की यायची,
कोणाच्याही नावावरून मला ती चिडवून पहायची.
मीही हसून खोटा राग दाखवायचो,
तिच्या चिडवण्यावर  खोटे खोटे चिडून तिला खुश करायचो.
माझ्या वेदना आणि दुःख तिला कधीच दाखवले नाही,
एका शब्दानेही मी तिला काही कळू दिले नाही.
त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली,
माझी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली.
तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणून करून दिली.
मी भेट दिलेल्या माझ्या कवितांची वही त्याला दाखवली.
दुसऱ्याच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली,
कारण त्याला कदाचित तिच्याबद्दल असुरक्षितता भासली.

तिला मात्र कधीच ह्याची भीती नाही वाटायची,
कारण ती मला फक्त स्वतःचा 'Best Friend' मानायची...

तिच्या लग्नामध्ये तिने मला आवर्जून बोलावले,
"लग्नाला नक्की यायचे" असे पत्रिकेत लिहून पाठवले.
माझ्या हृदयाची शकले मीच गोळा केली,
एक तिच्या आवडीची गिफ्ट घेऊन तिला भेट दिली.
चेहरा हासरा ठेऊन मी काळजी घेतली तिला खुश ठेवायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या लग्न नंतर मात्र मी एक गोष्ट केली,
कटाक्षाने तिची भेट टाळली.
माझ्या वागण्यातला फरक तिला कळू द्यायची माझी तयारी नव्हती,
कारण त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तिला,
माझ्या आसवांची मुळीच कदर  नव्हती,
मी इतके दिवस असे काहीच दाखवले नाही,
कारण ती मला फक्त स्वतःचा 'Best Friend' मानायची...

आयुष्यभर एकटे राहून जगात आलो,
तिच्या पात्रांना जाणून-बुजून एक-दोन ओळीत उत्तरे लिहू लागलो.
माझ्या 'busy Life' चांगला बहाणा माझ्याकडे होता,
तिच्याही व्यापांमुळे तिला अजिबात वेळ नव्हता.
तरीपण माझ्या एक-दोन ओळींना ती आवर्जून उत्तर पाठवायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या अखेरच्या खाणी मी तिला भेटलो,
इतके दिवस थामावालेल्या अश्रुंसकट तिच्याशी बोललो.
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही,
मलाही तिथे जास्त वेळ थमावले नाही.
तरीही एका वाक्यात तिने मला सांगितले,
"तू आतापर्यंत खरे मित्रत्व दाखवले"
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली,
ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

आता माझाही प्रवास संपत आला आहे,
मागे वळून बघताना त्या हिरवळीचा आता हेवा वाटत आहे,
आताच पोस्टमन येऊन हे parcel देऊन गेला,
माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेला.
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जून माझ्यासाठी काही ठेवायची?
पण नाही, कारण...
ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या डायऱ्यामध्ये मला सापडले,
माझे हरवलेले क्षण, आठवणी,
खोड्या, थट्टा, हसणे, बोलणे, रडणे,
गुपिते, गोष्टी, गाठी-भेटी.
मैत्री आणि बराच काही...
आणि पटत गेले कि,
खरच ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

जेव्हा शेवटच्या पानावरच्या तिच्या ओळी वाचल्या,
हृदयातल्या अश्रूंना जणू वाट मोकळ्या झाल्या.
"मला वाटतंय त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त त्याने मला विचारायची देर आहे.
मला तर तो प्रचंड आवडतो,
मी त्याला
'Best Friend' म्हटल्यावर,
गालातल्या गालात हसतो.
मनातलं गुपित फोडतो, माझे सगळे ऐकतो,
माझ्याशी भांडतो,
त्याच्या कविता ऐकवून माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो,
माझ्यावर प्रेम करतो...
खरच का तो माझ्यावर प्रेम करतो???"


जणू माझ्याच ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो,
मारण्यापूर्वीच सरणावर जळत होतो.
काय गरज होती मरणशय्येवर
नियातीनेही माझी अशी क्रूर थट्टा करायची?
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून द्यायची कि,
"वेड्या, तू तुला तिचं 'खरं प्रेम' मानायची...